प्रामाणिकपणा अजूनही जिवंत… विसरलेला मोबाईल बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्यांने केला परत

83

(मोताळा लाईव्ह )आजकालच्या काळात दुसऱ्याचे ओरबाळून खाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. तरीही समाजात अजूनही माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे कुठे ना कुठे तरी दिसून येते. असेच एक उदाहरण समोर आले आहे.
बुलडाणा अर्बन शाखा मोताळा येथील खातेदार रत्नमाला थेरोकार ह्या दि 12 डिसेंबर रोजी मोताळा शाखेत व्यवहार करण्यासाठी आपल्या वडिलासोबत आल्या व्यवहार झाल्यानंतर त्या निघून गेल्या मात्र त्या आपला सॅमसंग कंपनीचा मोबाईल शाखा कार्यालयात विसरून गेल्या. सदरचा मोबाईल शाखेचे शिपाई रविंद्र राठी यांना सापडला त्यांनी लगेच शाखा व्यवस्थापक श्रीकृष्ण पाटील यांचेकडे स्वाधीन केला. याची माहिती मलकापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक आनंद चांडक यांना दिली. नंतर त्याच मोबाईल वर आलेला कॉल घेतला असता ओळख पटवून सदरचा मोबाईल रत्नमाला थेरोकार यांचा असल्याचे निष्पण झाले. त्यांचे सांगण्यावरूण त्यांचे वडिल निना तायडे यांना शाखा कार्यालयात बोलावून त्यांना शाखा व्यवस्थापक यांचे हस्ते परत करण्यात आला. या घटनेच्या निमित्ताने प्रामाणिपणा दाखवलेल्या बुलडाणा अर्बनच्या रविंद्र राठी याचे सर्वत्र कौतुक होत आहे.